शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस यंत्रणेतील दोषांमुळेच अनिकेतचा मृत्यू : बिपीन बिहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:05 IST

सांगली : पोलिस कोठडीत ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळण्याची घटना धक्कादायकच आहे.

ठळक मुद्देपोलिस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. मारहाणीत आरोपी मृत्यू झालेल्या अनेक घटना घडल्या सांगलीत घडलेल्या घटनेला पोलिसांनी वेगळेच वळण

सांगली : पोलिस कोठडीत ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळण्याची घटना धक्कादायकच आहे. देशातील ही पहिली घटना तीही सांगली शहरात घडली. यामागे पोलिस यंत्रणेतील दोष कारणीभूत आहेत, अशी कबुली राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांनी दिली.

निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. वरिष्ठ अधिकाºयांनी त्याला वेळीच रोखून कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती, असेही त्यांनी सांगितले.अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण व उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेण्यासाठी बिहारी शुक्रवारी रात्री सांगलीत दाखल झाले होते.

शनिवारी सकाळी त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याकडून माहिती घेतली. कोथळेचे नातेवाईक, साक्षीदार यांच्याशी संवाद साधला. सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार वर्मा यांच्याशी तपासाबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बिहारी म्हणाले की, देशभरात आतापर्यंत पोलिस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत आरोपी मृत्यू झालेल्या अनेक घटना घडल्या आहेत. पण सांगलीत घडलेल्या घटनेला पोलिसांनी वेगळेच वळण दिल्याने पोलिस दलाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. अनिकेतकडून गुन्हा कबूल करुन घेण्यासाठी कामटेच्या पथकाने ‘थर्ड डिग्री’चा वापर केला. यात त्याचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही त्यांची क्रूरता वाढत गेली. मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात नेऊन जाळला.

पोलिसांचे हे कृत्य धक्कादायक आहे. आठ हजाराच्या चोरीच्या गुन्'ाचा तपास करण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर करण्याची काय गरज होती? आजही पोलिस दलात काही अधिकारी थर्ड डिग्रीचा वापर करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.यंत्रणेत दोषबिहारी म्हणाले की, कामटेची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकाºयांनी या तक्रारींची दखल घेऊन कामटेवर कारवाई करायला हवी होती. त्याला वेळीच रोखले असते तर, अनिकेत कोथळे प्रकरण घडले नसते. यामागे पोलिस यंत्रणेतील दोष कारणीभूत आहेत.बदल केले पाहिजेतअनिकेत कोथळेच्या मृत्यू प्रकरणावेळी पोलिस ठाण्यातील सीसी टीव्ही कॅमेरे बंद होते. याबाबत बिहारी म्हणाले की, त्याबाबत तपास सुरू आहे. पोलिस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. स्वत:मध्येही बदल केले पाहिजेत.पोलिस ठाण्याला भेटबिहारी यांनी शहर पोलिस ठाण्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे होते. ज्या ‘डी.बी.’च्या खोलीमध्ये अनिकेतचा खून झाला, त्याचीही पाहणी केली. अधिकारी व कर्मचाºयांशी संवाद साधला.

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे